उपवर्गीकरणामुळे जाती जातीत तेढीचा कुटिल डाव हाणून पाडा मतभेद बाजूला सारून लढ्यासाठी सर्वांनी एकत्र या : आनंदराज आंबेडकर

0

मुंबई : दि. २६ (रामदास धो. गमरे) शासनाने अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा जो कुटिल डाव आखला आहे तो घटनाबाह्य असून तो घटनेची पायमल्ली करत आहे. भारतीय घटनेच्या माध्यमातून एससी समूहाला जे आरक्षण मिळालं आहे ते प्रत्येक जातीच्या संख्याबळावर देण्यात आले होते. आजच्या तारखेस एससी मध्ये ६० जाती मोडतात त्याचा एससी समूह निर्माण झाला असून हा समूह अ, ब, क, ड या वर्गीकरणाच्या विरोधात आहे परंतु शासन हुकूमशाही आणि दंडेलशाहीच्या माध्यमातून उपवर्गीकरण करून जाती जातीत तेढ निर्माण करीत आहे. न्यायमुर्ती अनंत बदर यांच्या अधिपत्याखाली जो अहवाल तयार करण्यात आला तो प्रसिद्ध न करता शासन मनमानी करत आहे, कोणताही अहवाल सादर केल्यानंतर त्यावर विचार विनिमय होतो त्यावर हरकती मागवल्या जातात, त्यांची नोंद घेतली जाते व त्यानंतर अंतिम निर्णय घेऊन तद्नंतर तो लागू अहवाल करण्यात येतो. आज तस काही न करता शासन सरळ सरळ वटहुकूम जारी करीत आहे. आज एससी मध्ये ६० उपजाती आहेत त्यांना विश्वासात घेऊन सदर संदर्भात चर्चा करून त्यांचेही मत घेतले पाहिजे तशी कोणतीच शासकीय प्रक्रिया न करता शासन सरळ सरळ हुकूमशाहीच्या माध्यमातून हे उपवर्गीकरण आणून जाती जातीत भेद आणि तेढ निर्माण करीत आहे, मागच्यावेळी शासनाने मराठा आणि ओबीसी असा वाद पेटवून दिला त्याप्रमाणे आज एससी मधील जात समूहांमध्ये आपापसात भांडण लावून स्वतः मात्र नामानिराळे राहतात. आजतागायत जात गणना झाली नसून शासनाने आता २०२७ ला जातगणना करण्याची घोषणा करीत आहे परंतु जोपर्यंत न्यायमुर्ती अनंत बदर यांचा अहवाल सर्वांसमोर सादर केला जात नाही तोपर्यंत शासनाने उपवर्गीकरणाचे जे धोरण राबवले आहे ते ताबडतोब रद्द करावे अन्यथा संपूर्ण एसी मधील ५९ जात समूह रस्त्यावर उतरतील असा शासनाला कडक इशारा आनंदराज आंबेडकरांनी दिला आहे, तरी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन शासनाचा कुटिल डाव हाणून पाडा असे प्रतिपादन बौद्धजन पंचायत समितीच्या ८५ व्या वर्धापनदिनाच्या निम्मित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी प्रमुख मार्गदर्शक या नात्याने बोलत असताना केले.

अधिक वाचा  फुगेवाडी दारूकांडाचा मोठा खुलासा; 155 लिटर विषारी दारू जप्त, मिथेनॉलचा खेळ उघड

बौद्धजन पंचायत समिती केंद्रीय कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने बौद्धजन पंचायत समितीचा ८५ वावर्धापनदिन उपसभापती विनोद मोरे यांच्या अधिपत्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आहे तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी आपल्या सुमधुर आवाजात धार्मिक पूजापाठ संपन्न केला, सदर कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या भारदस्त व पहाडी आवाजात केले त्यावेळी त्यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या जडणघडणीच्या अनेक गोष्टी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. या वर्धापनदिनानिमित्त विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, मंगेश गायकवाड, सुशीला ताई जाधव, महाड क्रांतीभूमीचे सुपुत्र भगवान तांबे, यशवंत कदम, श्रीधर साळवी, मनोहर सखाराम मोरे यांनीही आपले मौलिक असे विचार मांडून बौद्धजन पंचायत समितीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या आढावा घेऊन उपस्थितांना बौद्धजन पंचायत समितीच्या ८५ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  पुण्यात एक धक्कादायक घटना पिंपरीनंतर पुण्यात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू. नेमकं काय घडलं?

कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “बौद्धजन पंचायत समितीच्या पंच या शब्दाचा विस्तृत अर्थ सांगत सदर शब्द महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या पुस्तकात नमूद केला आहे. तोच शब्द वापरण्यात आला” तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या वाटचालीच्या अनेक घडामोडी मांडत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात बोलत असताना उपसभापती विनोद मोरे यांनी “ज्या थोर लोकांनी बौद्धजन पंचायत समितीची जडणघडण केली त्यामुळे आपण आज याठिकाणी उभे आहोत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी बौद्धजन पंचायत समितीची सूत्र हाती घेतल्यानंतरच बौद्धजन पंचायत समितीच्या कार्यात लक्षणीय बदल झालेला दिसत आहे याचे सर्व श्रेय आनंदराज आंबेडकरांना जात, बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब यांनी बाबासाहेबांच भारतील पहिले स्मारक उभारले ते छोटे होते परंतु बाबासाहेबांचे नातू व भैय्यासाहेबांचे सुपुत्र सभापती आनंदराज आंबेडकरांनी दूरदृष्टी ठेवून सर्व शाखांच्या सहकार्याने सात मजली स्मारक सभागृह उभारले आहे. आज खेड्या प्रचार व प्रसार करून नवनवीन शाखा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत, म्हणूनच बौद्धजन पंचायत समिती आज अश्वाच्या वेगाने उत्तरोत्तर प्रगती करीत आहे हे संपूर्ण श्रेय आनंदराज आंबेडकरांचे आहे” असे नमूद करीत उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  पुणे महापालिकेतील ‘या’ धक्कादायक अहवालाने खळबळ; ४५० ते ५०० कर्मचारी पगार पालिकेचा, काम राजकिय नेत्यांच्या घरी!

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस श्रीधर जाधव, रविंद्र शिंदे, तुकाराम घाडगे, भगवान तांबे, यशवंत कदम, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, विश्वस्त महेंद्र शिवराम पवार, प्रकाश कमलाकर जाधव, उदय कांबळे, गजानन तांबे, अतुल साळवी, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, मंगेश गायकवाड, महाड क्रांतीभूमीचे सुपुत्र भगवान तांबे, श्रीधर साळवी, सुशिलाताई जाधव, विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सदस्य, सभासद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. सरतेशेवटी मंगेश पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.