यंदा कमी पावसाचा अंदाज ‘पाटबंधारे’ची पालिकेला १५ % कपातीची सूचना; उन्हाळ्यात पुन्हा वादाची शक्यता

0

पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला १५ टक्के कपात करण्याची सूचना केलेली असताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आम्ही एक थेंब ही पाणी कपात करणार नाही. पुणेकरांना सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पुन्हा एकदा महापालिका आणि पाटबंधारे यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.

पुणे शहराचा पाणीपुरवठा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पावर अवलंबून असून सध्या धरणांमध्ये ४५ टक्के पाणी साठा आहे. पुणे शहरासाठी दर महिन्याला किमान दीड टीएमसी पाणी आवश्‍यक आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरले पाहिजे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणी कपात करण्याची सूचना केला आहे.

अधिक वाचा  मोदी मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल 4 जागा रिक्त? बड्या नेत्यांना जबाबदारी ‘या’ चेहऱ्यांना संधीची शक्यता

त्यावर भीमाले म्हणाले, ”पाटबंधारे विभागाने काही पत्र पाठवले तरी आम्ही पाणी कपात करणार नाही. पुणेकरांचे एक थेंबही पाणी कमी होणार नाही. ही आमची ठाम भूमिका आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी कपातीची गरज नाही.

दरम्यान, पाणीसाठ्याच्या आढाव्यासाठी उद्या (ता. १०) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रशासनाची भूमिका पाणी बचतीची

यंदाच्या पावसाळ्यात कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी बचत करणे आवश्‍यक आहे.त्यासाठी महापालिका पाणी बचत, गळती रोखणे आणि वितरण सुधारणा करत आहे. यामध्ये अनधिकृत नळजोडांवर कारवाई आणि त्यांचे नियमितीकरण याला प्राधान्य दिले जात आहे.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीत वादाची ठिणगी; स निधी काढण्याचं पाप आयुक्तांनी ठराव निरस्त करण्यासाठी राज्याकडे सुमोटो पाठवा