स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानतर्फे राजगड कादवे गावातील जंगलात मानवनिर्मित पाणवठ्याची निर्मिर्ती; वन्यजीवांची तहान भागणार

नवनिर्वाचित राजगड तालुका सभापती सुवर्णा किरण राऊत व उपसभापती यांचे हस्ते उद्घाटन

0

इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देवून नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे. ऐतिहासिक वास्तू,पाणी संवर्धन,वीरगळ संवर्धन,पर्यावरण संवर्धन, विहिरीचे पूर्णजीवीकरण, प्राचीन अवशेष असलेल्या जागेची साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे. नुकतेच प्रतिष्ठान मधील तरुणाने राजगड तालुक्यातील कादवे गावातील जंगलात वन्य प्राण्यांसाठी मानवनिर्मित पानवठयाची सोय करण्यात आली. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वनातील नैसर्गिक जलस्त्रोत लवकर आटल्याने डोंगरादार्‍यातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे.वन्यजीव पाण्याच्या शोधात वाड्या वस्तीलगतच्या असलेल्या शेतात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत
उष्णता एवढी वाढली आहे की झाडावर बसलेले पक्षी बेशुद्ध पडू लागलेत. माणसाने भर गर्मीत जर थंड पाणी पिले किंवा थंड पाण्याने हातपाय धुतले तर शरीरातील छोट्या छोट्या रक्ताच्या शिरा फाटन्यासारख्या घटना घडू लागल्यात. अशा उष्णतेत पशू पक्षी आपला घसा ओला करण्यासाठी धडपडताना दिसताहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वनपरीक्षेत्र राजगड (उप वनविभाग भोर ) हद्दीत कादवे गावाच्या जंगलात जागोजागी करण्यात आली आहे,15 बाय 15 या साइज मध्ये प्लॅस्टिक कागद अंथरून सिमेंट चे पाणवठे बांधण्यात आले.. टँकर द्वारे पाण्याची सोय करण्यात आली.व मुक्या जीवांची तृष्णा भागवली जात आहे तेच क्षण.मित्रांनो एक मनुष्य धर्म म्हणून आपणही आपल्या शेतात किंवा अंगणात पशूपक्षांना पाणी ठेवायला विसरू नका.ह्यासाठी पर्यावरण संवर्धनातुन पाणवठ्यांची निर्मिती मोहीम राबविण्यात आली होती.

अधिक वाचा  राष्ट्रवादी अजित पवार गटात पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार? नाराज नेता अ‍ॅक्शन मोडमध्ये

*प्रतिष्ठान चे राजगड तालुका प्रमुख अक्षय जागडे म्हणाले*, गेले अनेक वर्षांपासून हे काम करत आहोत . पाण्याच्या शोधात प्राणी गावाकडे येत आहे त्यामुळे शिकारीचे प्रमाण वाढत आहे.ह्यासाठी उपाय म्हणुन रानातच असे पाणवठे तयार करून त्यांची तहान भागवली जाते.गावापासून दूर जंगलात दर आठवड्याला टँकर द्वारे त्यात पाणी सोडणार आहे… त्याच बरोबर वन्यजीवांना आवडणारी फळझाडे आजूबाजूला लावून वृक्षारोपण करण्यात आले..
दररोज उन्हाळ्याची वाढत आहे तीव्रता
पशु पक्षांच्या रक्षणासाठी सर्व घेऊ या दक्षता त्याच बरोबर वन्यजीव वाचवा पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश सदैव देत राहणार. पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी सहकार्य करून आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी माहितीचा हात पुढे करावा असे आव्हान अक्षय जागडे यांनी केले

अधिक वाचा  राज्य सरकारचा निसर्गाच्या मुळावरच घाव! वृक्षतोड परवानगीसाठी कागदपत्रांची संख्या ११ वरून थेट ५ कागदपत्रे; पर्यावरणाला फटका?

राजगड तालुक्याच्या सभापती सुवर्णा राऊत , उपसभापती संदीप खुटवड, जिल्हा परिषदेचे सदस्य अमोल नलावडे, किरण राऊत, सीता खुळे, वनरक्षक राजेश निंभोरे, अक्षय जागडे, दिनेश जागडे, काळुराम जागडे, मंगेश नवघणे, सागर फाटक, भारत रेणुसे, ऋषिकेश साळुंखे, ओंकार जागडे, आर्यन जागडे, विनोद मराठे, चेतन जागडे, संस्कार शिंदे, रविंद्र जागडे, आकाश जागडे, स्वराज जागडे, वृक्षमित्र धनंजय कोकाटे व समस्त कादवे ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्याला पीडीसी बँकेच्या संचालिका निर्मलाताई जागडे, विनोद बिरामने, बाळू मराठे, आपत्ती व्यवस्थापन चे तानाजी भोसले उत्तम पिसाळ आणि नवनाथ तिडके यांची मोलाची साथ लाभली.. या मोहिमेचे आयोजन अक्षय जागडे यांनी केले होते.

अधिक वाचा  बीड जिल्ह्यात २४१ कोटी रुपयांचा ‘आयएएस’ घोटाळा कसा घडला? अविनाश पाठक यांची कारकीर्दही वादग्रस्त