पुण्यात ‘करेक्ट’लढती साध्य होताच भाजपचे ‘त्रिकूट’ अजितदादांनी केलं लक्ष्य; पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे देवाभाऊंही निशाण्यावर…

0

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका विजयी करण्याचा संकल्प केलेल्या अजितदादांनी पुण्यात ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्यासाठी अपेक्षित ठेवलेल्या लढती साध्य केल्यानंतर थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आश्रयात असलेल्या ‘त्रिकुटा’ला लक्ष करत पुण्याचे शिल्पकार म्हटले जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधण्याचे काम केले आहे. पुणे महापालिकेमध्ये निधीची कमतरता नसतानाही नियोजनबद्ध विकास झालेला नाही. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांनी लॉन्ग टर्मचा विचार करून नियोजनबद्ध कारभार करणे आवश्यक होतं. मात्र तसं झालं नाही, त्यामुळे पुण्यातील नागरी समस्या खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भाजपवर सडकून टीका केली.

अधिक वाचा  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, निकषांची माहिती यांनाही लाभ नाही

राज्यात एकत्र सत्तेत असलेले महायुतीतील मित्रपक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने आले आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी असे सलग दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यानंतर शनिवारी त्यांनी पुणे शहराकडे मोर्चा वळवला. संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या सगळ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले, नवले ब्रिजच काही बोलायला नको, सिंहगड रोडवरील फ्लायओवरचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने आता तिथे तोडफोड करावी लागणार आहे. पुण्यातील कारभारी लोक कमी पडली म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे पडले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुण्याचे शिल्पकार म्हणतात त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला.

अधिक वाचा  पुणे पोलिस दलात फेरबदल; ११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नियोजनशून्य कारभार असल्यामुळे पुण्यात पाणी प्रश्न निर्माण होतोय, नाकर्तेपणामुळे पुण्यावर अशी वेळ आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या पद्धतीने पूर्वी कारभारी बदला अशी हाक दिली होती त्याच पद्धतीने आता देखील पुणेकरांनी कारभारी बदलण्याची वेळ आली आहे. जे भाजपचं त्रिकूट आहे त्याला पुण्यातील सत्तेपासून दूर करण्याची वेळ आली असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितलं.

भाजपचे त्रिकूट म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर टीका केली असल्याचं बोलत जात आहे. पत्रकारांनी त्रिकूट कोण विचारलं असता मी त्यांचं नाव घेणार नाही मात्र तुम्ही हुशार आहात तुम्हाला ते त्रिकूट कोण आहे हे माहिती आहे असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  मान्सून पुन्हा लांबणीवर…महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या