






· शाश्वत पर्यायांच्या श्रेणीला वित्तसहाय्य करण्यासाठी खास विभाग समर्पित
· इव्ही वाहने, बॅटरी चार्जिंग स्टेशन्स, अक्षय उर्जा उत्पादने आणि पर्याय, वीज कार्यक्षम यंत्रे आदींसाठी वित्तपुरवठा करत हरित वित्त पोर्टफोलिओची उभारणी करणार
· आगामी ३ त ४ वर्षात या विभागाच्या माध्यमातून ५ हजार कोटी रुपयांचा एयूएम गाठण्याचे उद्दीष्ट
पुणे : श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (श्रीराम फायनान्स) हरित वित्तसहाय्याशी संबंधित आपले सर्व उपक्रम श्रीराम ग्रीन फायनान्स अंतर्गत एकत्रित करत हरित वित्तसहाय्याबाबतची आपली वचनबध्दता आणखी बळकट केली आहे. श्रीराम ग्रीन फायनान्स ही कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रीक वाहनांव्यतिरिक्त अन्य पुरक घटकांना वित्तपुरवठा करण्यासाठी समर्पित आहे. शाश्वत उपक्रमांना गती देण्याबरोबरच वित्तसहाय्याच्या संधींची व्याप्ती वाढवत शाश्वत उपक्रमांच्या वाढीस चालना देण्यासाठी कंपनीने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
इलेक्ट्रीक वाहनांसाठी वित्तपुरवठा करण्याबाबतच्या आपल्या विद्यमान कौशल्याचा वापर करताना श्रीराम ग्रीन फायनान्स शाश्वततेसाठीच्या आपल्या प्रयत्नांवर सखोल लक्ष केंद्रीत करणार आहे. तसेच त्यात अधिकाधिक स्पष्टतासुध्दा आणणार आहे.
इव्ही वाहने, बॅटरी चार्जिंग स्टेशन्स, अक्षय उर्जा उत्पादने आणि पर्याय, वीज कार्यक्षम यंत्रे आदींसाठी वित्तपुरवठ्याआधारे अतिशय सक्षम हरित वित्त पोर्टफोलिओच्या उभारणीचे उद्दीष्ट कंपनीने बाळगले आहे. त्याआधारे श्रीराम ग्रीन फायनान्स आपल्या हरित वित्तपुरवठा व्यवसाय आणखी बळकट करत आहे. विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागात कंपनीच्या विस्तारलेल्या व्यापक ग्राहक आधाराचा लाभ घेताना हरित वित्तसहाय्यात परिवर्तनकारी भूमिका बजावण्याची क्षमता श्रीराम फायनान्समध्ये आहे. कंपनीने आगामी 3-4 वर्षांमध्ये हरीत वित्तसहाय्य विभागात व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेचे (एयूएम) प्रमाण 5,000 कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आखलेले आहे.
श्रीराम ग्रीन फायनान्स स्थानिक आणि जागतिक पातळीवर निधी उभारणार आहे आणि विविध घटकांना अधिकाधिक कर्जपुरवठा करण्यासाठी हा निधी हरित गुंतवणूकीला प्राधान्य देणार आहे. या नवीन बदलाबद्दल टिप्पणी करताना श्रीराम फायनान्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. उमेश रेवणकर म्हणाले, “श्रीराम ग्रीन फायनान्स या नवीन विभागाचा शुभारंभ हा श्रीराम फायनान्सच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. आम्ही भारतातील अग्रगण्य वित्तीय संस्थांपैकी एक प्रमुख कंपनी असून पर्यावरणीय दृष्टीकोनातून कामकाज करणे तसेच शाश्वत आर्थिक पर्यायांसह भागधारकांना सक्षम बनवण्याच्या आमच्या जबाबदारीबाबत कटिबद्ध आहोत. हा उपक्रम आमच्या धोरणांना हरित अर्थव्यवस्थेच्या दिशेने जागतिक पातळीवरील बदलांसोबत एकरुप करण्याबाबतचा भऱभक्कम पुरावा आहे. तसेच आम्ही दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी आखत असलेला मार्ग कंपनीचा उद्देश आणि नफा यांच्यात संतुलन घडवून आणतो.”
श्रीराम फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वाय. एस. चक्रवर्ती म्हणाले, “श्रीराम फायनान्समध्ये, आम्ही शाश्वततेला प्रगतीचा एक अत्यावश्यक घटक मानतो. ग्रीन फायनान्स हा विभाग सर्व भागधारकांना लाभ देणारी शाश्वत अर्थप्रणाली आकारास आणण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे उदाहरण होय. किमान-कार्बन अर्थव्यवस्थेत आमचे सर्व ग्राहक आणि भागीदारांची भरभराट होण्यासाठी त्यांना सक्षम करण्याबाबत हा उपक्रम आमचे समर्पण अधोरेखित करते. ”
सरकारकडून राबविली जात असलेली महत्वाकांक्षी धोरणे, तांत्रिक प्रगती आणि वाढत्या पर्यावरण जागरूकतेमुळे भारताचे इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्र वेगाने विस्तारत चालले आहे. इव्ही विक्री, चार्जिंगसाठीचे पायाभूत क्षेत्रसुध्दा वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर जलद-चार्जिंग आणि बॅटरी-स्वॅपिंग तंत्रज्ञानासह नानाविध सुविधा वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
भारताचा उर्जा कार्यक्षम यंत्रसामग्री विभाग अजूनही बाल्यावस्थेत असताना, भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्राने गेल्या दशकात महत्त्वाकांक्षी सरकारी उपक्रमांच्या जोरावर आणि शाश्वततेकडे दिवसेंदिवस अधिकाधिक लक्ष केंद्रित करताना उल्लेखनीय वाढ अनुभवली आहे. या सर्व घडोमोडी श्रीराम फायनान्ससाठी अमाप संधी देत आहेत.
श्रीराम ग्रीन फायनान्स सुरुवातीच्या टप्प्यात कर्नाटक, केरळ, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि महाराष्ट्रात इव्ही पोर्टफोलिओ साकारण्यावर भर देणार असून त्यानंतर भारतातील अन्य भागांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. श्रीराम फायनान्स दीर्घकालीन भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी सक्रियपणे कार्यरत असून त्याव्दारे ग्राहकांना अखंड आणि सहजपणे वाहन वित्तपुरवठा उपाय सुनिश्चित करत आहे.











