प्रतिज्ञा खरी ठरणार, फडणवीस 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान! महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादीही वाचा

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर सर्व प्रक्रिया पार पडून लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा खरी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपला जाणार, अशी शक्यता दिसल्याने सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. मात्र काल झालेल्या दिल्लीतील बैठकीचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यात अजित पवार, प्रफुल पटेल, जेपी नड्डा, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचे दिसून आले. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. याबाबत विचारले असता मी कधी गंभीर, हसरा तुम्हीच ठरवता…मी आजही खुश आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दर्शवला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

देवेंद्र फडणवीस 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री

याआधी देवेंद्र फडणवीस हे 2014 मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दाखवला. 2019 साली भाजपाने शिवसेनेशी हातमिळवणी करत महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीला 161 जागा मिळाल्या. त्यात भाजपाने 105 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन आग्रह सुरु केला. यानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. त्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्याकडे गेल्याने हे सरकार केवळ 72 तास चालले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सत्ता स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस यांना 105 आमदारांसह विरोधक म्हणून बसण्याची वेळ आली. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईल’ असा नारा दिला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती.

‘मी पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा खरी ठरणार

21 जून 2022 साली एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. पुढे अजित पवार देखील शिंदे-फडणवीस यांच्या सोबत सरकारमध्ये स्थापन केले. 2024 सालच्या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने एकत्रित लढल्या. यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्यातच कालच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सगळं ठरल्यानुसार सुरळीत पार पडलं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ची प्रतिज्ञा खरी ठरणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी:

1. यशवंतराव बळवंतराव चव्हण – 1 मे 1960 ते 20 नोव्हेंबर 1962

2. मारोतराव सांबशिव कन्नमवार -21 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3. परशुराम कृष्णाजी सावंत (हंगामी) 25 नोव्हेंबर 1963 ते 04 डिसेंबर 1963

4. वसंतराव फुलसिंग नाईक- 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975

5. शंकरवर भाऊराव चव्हाण – 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

6. वसंतराव बंडुजी पाटील – 17 एप्रिल 1977 ते 6 मार्च 1978

7. वसंतराव बंडुजी पाटील – 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978

8. शरदचंद्र गोविंदराव पवार -18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

9. अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले -9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

10. बाबासाहेब अनंतराव भोसले – 20 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

11. वसंतराव बंडूजी पाटील- 02 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985

12. वसंतराव बंडूजी पाटील- 10 मार्च 1985 ते 1 जून 1985

13. शिवाजीराव भाऊराव पाटील- निलंगेकर -03 जून 1985 ते 7 मर्च 1986

14. शंकरराव भाऊराव चव्हाण – 14 मार्च 1986 ते 24 जून 1988

15. शरदचंद्र गोविंदराव पवार -25 जून 1988 ते 3 मार्च 1990

16. शरदचंद्र गोविंदराव पवार -04 मार्च 1990 ते 25 जून 1991

17. सुधाकरराव राजूसिंग नाईक – 25 जून 1991 ते 23 फेब्रुवारी 1993

18. शरदचंद्र गोविंदराव पवार -06 मार्च 1993 ते 13 मार्च 1995

19. मनोहर गजानन जोशी -14 मार्च 1995 ते 30 जानेवारी 1999

20. नारायण तातू राणे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

21. विलासराव दगडोजी देशमुख -18 ऑक्टोबर 1999 ते 18 जानेवारी 2003

22. सुशिलकुमार संभाजीराव शिंदे – 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोबर 2004

23. विलासराव दगडोजीराव देशमुख -1 नोव्हेंबर 2004 ते 7 डिसेंबर 2008

24. अशोक शंकरराव चव्हाण -8 डिसेंबर 2008 ते 8 नोव्हेंबर 2009

25.अशोक शंकरराव चव्हाण – 1 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2010

26. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण – 11 नोव्हेंबर 2010 ते 27 सप्टेंबर 2014

27. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

28. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस – 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019

29.उद्धव बाळासाहेब ठाकरे – 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022

30. एकनाथ संभाजीराव शिंदे- 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024