नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात फक्त अन् फक्त 22 श्रीमंतांना अन् 5% अभिजन वाचवण्याची तडफड पाहण्यास मिळत असून देशातील 90% जनतेची फसवणूक केली जात आहे. मला आगामी काळात 90% जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणायचाय आहे. सध्या माध्यमे माझ्यावर सडकून टिका करतात परंतु मी त्याची चिंता करत नाही कारण हे सुद्धा त्याच 5% समुदायचेच असून 90% गोरगरिब महिलेच्या जनतेच्या चेहऱ्यावर येणारे हास्य महत्त्वाचं आहे असे भावनिक आवाहन राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेतून केले. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारसभेत राहूल गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महविकास आघाडीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.






देशातील आज जी गरिबी वाढत आहेत त्याला नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांना भांडवलशाही अर्थव्यवस्था बळकट करायची आहे. त्यामूळे 90% गोरगरिब जनतेकडे मनरेगावरच अवलंबून जीवन जगावे लागत आहे. देशातील सर्व शक्तिकेंद्रावर 5% लोकांना ताबा ठेवायचा आहे म्हणून मोदी यांच्या पक्षाला भरभरून निधी दिला त्यामुळेच देशात जाती जनगणना केली जात नाही. देश कोव्हिड लस मिळवण्यासाठी दारोदार भटकत असताना या लसीमध्येही पार्टी फंड नरेंद्र मोदींना घेतला. आजपर्यंत नरेन्द्र मोदी जनतेच्या हक्काचं श्रीमंतांना जेवढे धन दिलं ते परीक्षण करुन गोरगरिबांना वाटणार असल्याचेही राहूल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेतून सांगितले.
अदानीचा मुलगा पक्की नोकरी करतो पण 90 % जनतेला पक्की नोकरी का मिळत नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पहिली पक्की नोकरी (१ वर्षाची) अन् 1,00,000 रूपये तरुणांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. चुकीची gst रद्द करुन 5 प्रकारचे कर लागू केले जातील. प्रत्येक गरिबांच्या घरात महिलांच्या घरात 100000 (8500प्रति महिना) रूपये जमा करण्यात येणार आहेत. त्याबरोबच आशा सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात येणार आहे. तसेच मगरेनाचे मानधन 400 रूपये कऱण्यात येणार आहे. त्याबरोबरच किसान कर्जमाफी आयोग निर्माण करून ज्या ज्यावेळी आयोग कर्जमाफी सांगेल त्या त्यावेळी कर्जमाफी करण्यात येइल असेही आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.
नरेंद्र मोदींच्या प्रचारात सध्या पाकिस्तानची गोष्ट आणून ड्रामा सूरू आहे. देशातील अन् राज्यातील वरिष्ठांचा अपमान करण्याचा रेटा सूरू असून बलात्कारी रवंन्ना रेड्डी यांचे समर्थन केले जात आहे. मोदी अगोदर जाहीरपणे ओबीसी असल्याचं सांगत होते. नंतर त्यांची जात 650 श्रीमंत लोकांना वाचवणारी झाली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाची 50% अट काढली जाणार आहे. अन् त्या 22 श्रीमंताच्या संस्थेतील कर्मचारी वर्गातही पक्की नोकरीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. देशातील ताळेबंदाचाही 10 वर्षात फक्तं 22 लोकांनाच फायदा दिला आहे. तेचं आत्ता गोरगरिब जनतेकडे देऊन विकासाची दारे बंद केली ती पुन्हा खुली करायची आहेत.
महाराष्ट्र हे माझ्या दृष्टीने काँग्रेसी स्टेट आहे कारण काँग्रेस जी विचारधारा घेऊन देशभर काम करत आहे ती विचारधारा १०० वर्षापासून जपणारे महापुरुष याच मातीत जन्मले आहेत. देशात मी भ्रमंती करून एक गोष्ट जाणली आहे त्यामूळे देश बदलणारी फौज तयार करत आहे. आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर सारखा तळमळीचा समाजसेवक कार्यकर्ता या फौजेत सहभागी होणारच आहेत असेही आवाहन राहूल गांधी यांनी केलं.













