काहीकाळ पत्रकार परिषद थांबवली जयंत पाटीलांना बढती? ‘वेगळ्या’गटाची थेट पक्की बांधी?

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत संघटनात्मक बदल करणार असून नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन नवे नेतृत्व घडविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सध्याच्या पदावरून बढती देऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून समजते.

एकप्रकारे अजित पवार यांच्या गटाला शांत करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. मात्र जयंत पाटील यांना जरी प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले तरी नवा प्रदेशाध्यक्ष हा अजित पवार व सुप्रिया सुळे या दोघांच्याही संमतीनेच बनेल, असेही ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ‘भाकरी फिरवली नाही तर ती करपते’ असे सांगत पक्ष संघटनेत मोठे बदल केले जातील, असे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी अनेक कार्यक्रमात बोलून दाखवले आहे. ‘भाकरी फिरवायला निघालो होतो, पण भाकरी थांबली,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. मात्र ते पक्ष संघटनेतील अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या पदांवर असलेल्यांना बदलून नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने सांगितले.

अधिक वाचा  केंद्रीय महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! कोणती रणनीती आखणार? ‘हे’ ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

पवारांनी राजीनामा मागे घेतल्याने राष्ट्रवादीमधील ‘वेगळ्या’ विचाराचा गट नाराज

पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्याा सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर भर देण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प करणारे शरद पवार हे पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात हा पक्ष प्रभावशाली असून, त्याची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बदलापासून होईल, असे बोलले जाते.

अधिक वाचा  डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोलमांडले येथे स्मारक उभारण्याचा निर्णय

अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा

शरद पवार यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. याबद्दल शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. अजित पवार हे अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले आहेत का, असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, शरद पवारांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. ‘मी माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात न घेता निवृत्तीची घोषणा केली होती, तो अंदाज चुकीचा ठरला. आपल्या राजीनाम्याची कल्पना केवळ अजित पवार यांनाच देण्यात आली होती,’ असे शरद पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अजित पवार हे अनुपस्थित आहेत याकडे लक्ष वेधता, ‘सर्वच नेत्यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित असणे आवश्यक नसते,’ असे उत्तर पवार यांनी दिले.

अधिक वाचा  सुनेत्रावहिनी प्रचाराच्या रणधुमाळीतही पुणे महापालिकेत ‘ॲक्टिव्ह’?; एक तक्रार अन् मुंबईतून सूत्रे हलली, नेमकं प्रकरण काय?