शिवसेना खासदाराचं तळ्यात-मळ्यात; चार खासदार मतदारसंघात परतले ‘ऑपरेशन टायगर’चा डाव फसणार?

0

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या चर्चेत असलेल्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर मराठवाड्यातील एका खासदाराच्या संदीग्ध भूमिकेमुळे फसले असल्याची चर्चा सुरू असून सहा खासदारांपैकी चार खासदार आपल्या मतदार संघामध्ये परतले असून मुंबईतील एका खासदारांनी तर दैनंदिन कार्यक्रम सुरू केल्याने पुन्हा मातोश्री ‘भक्कम’असल्याची चर्चा आज सुरू झाली आहे. मुळात अगोदर शिवसेना फुटल्यानंतर शांत असणारे शिवसैनिक यावेळी मात्र संतप्त असून मोठ्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्या आहेत.

शिवसेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी किमान सहा खासदारांची गरज असली तरी सुद्धा मराठवाड्यातील ओमराजे निंबाळकर यांनी जाहीरपणे आपला निर्णय झाला नसल्याचे माध्यमांत जाहीरपणे सांगितल्याने अन्य खासदारांनी ही आपल्या मतदारसंघात परतण्यास प्राधान्य दिले आहे. मुळात केंद्रातील महत्त्वाच्या विधेयकांसाठी खासदारांची संख्या वाढ करणे ही भारतीय जनता पक्षाची गरज लक्षात घेऊन मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मागील काही महिन्यांपासून प्रचंड रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी सुद्धा हे सहा खासदार वेगळा गट स्थापन करणार की शिवसेनेमध्ये जाणार याबाबत मात्र आजही साशंकता आहे. या सहा खासदारांनी वेगळा गट निर्माण केला तर भारतीय जनता पक्षाला कोणतीही अडसर नाही परंतु जर या खासदारांनी शिवसेना या पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील शिवसेनेची वाढती ताकद ही भारतीय जनता पक्षाची मोठी अडसर आहे

अधिक वाचा  पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष मुक्तता, माफीचा साक्षीदार फितुर घोषित

या घडामोडींच्या केंद्रस्थानी असे सहा लोकसभा खासदार आहेत, ज्यांनी ठाकरे गटाविरुद्ध बंड केले आहे. दरम्यान २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पहिल्यांदा ठाकरे गटात फूट पाडली होती, त्यावेळी याच सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली नव्हती. आता हेच खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे, मात्र त्याच दरम्यान शिंदेंना ऑपरेशन टायगर करणं सोपं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केली जातोय. यामुळे काहीही घडू शकते, दुसरीकडे या सहा खासदारांपैकी कोणीही आतापर्यंत उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाहीये.

खासदारांनी बंड केलं तेव्हा ते शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी शिंदे गटात सामील होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नंतर ही बातमी फेटाळून लावण्यात आली. दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे फुटीर खासदाराच्या गटात सामील झाले नाहीत. ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांशी संबंधित खटल्यात काल एका विशेष न्यायालयाने निकाल दिला.

न्यायालायने ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात निकाल दिला. या निकालावर ओमराजे निंबाळकर नाराजी वर्तवली असून ते प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण आपल्या राजकीय भवितव्याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय घेऊ असं सांगितलं. तसेच आपण उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंच्या विरोधात कधीही बोलणार नाही, असंही सांगितलं.

अधिक वाचा  वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

ओमराजेंच्या निष्ठेवर प्रश्न

२०२२ मधील बंडापूर्वी ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. मात्र, बंडखोरांच्या यादीत त्यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या निष्ठेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचदरम्यान ओमराजे यांना त्यांच्या वडिलांच्या खटल्यात अनुकूल निकाल मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते; त्यामुळे ते शिंदे गटात जात असल्याचा दावा संदय राऊत यांनी केला होता.

शिंदें गटाचा दावा काय?

भाजप आणि ते नैसर्गिक मित्रपक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेशी तडजोड केली. म्हणूनच ते शिवसेनेला उद्धव ठाकरेंपासून दूर जात आहेत. एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा बंड केलं होतं त्यावेळी म्हटलं होतं की, “बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा रक्ताच्या नात्यावरून नाही, तर विचारधारेवरून ठरवला जाईल.”

त्यावेळी शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नेत्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना भेटण्यापेक्षा घरी राहण्यालाच ते अधिक पसंती देत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सहवासामुळे शिवसेनेच्या आमदारांना अडचणींचा सामना करावा लागत होता, म्हणूनच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

अधिक वाचा  कोथरुड विकास प्रकल्पांतील अडचणी दूर करून कामे गतिमान करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना

आताची परिस्थिती वेगळी

शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे ६ खासदारांना शिंदेंनी ओढलं. आताही शिंदे गटाकडून अजूनही तेच आरोप केले जात आहेत. पहिला आरोप असा की, ठाकरे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत आहेत. दुसरा आरोप असा की, ते पक्षाचे नेते आणि खासदारांना भेटत नाहीत. दरम्यान आतापर्यंत बंडखोर खासदारांपैकी कोणीही यासंदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निष्ठावान खासदारांनी शिंदे गटाने केलेले हे आरोप फेटाळून लावलेत. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ त्यांनी युक्तिवादही मांडलेत. ‘शिवसेना दिन’निमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, शिवसेना तीन दशके भाजपची मित्रपक्ष होती, पण कधीही त्यात विलीन झाली नाही; त्यामुळे आता हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असे मानण्याचे काहीच कारण नाहीये.