काश्मीरी सरकार अन् अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना मोठे यश; भीतीवर मात पुन्हा गजबजले पहलगाम नदीकाठी स्मारकही

0

जम्मू: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज, २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षापूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नरसंहारामुळे तेथील ओस पडलेली पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजली आहेत. पहलगाममध्येही त्यांची रीघ लागली आहे. अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकला भारतीयांनी लगावलेली ही सणसणीत चपराक आहे.

मर्यादांचे उल्लंघन केल्यास चोख प्रत्युत्तर; भारतीय लष्कर

कोणीही मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल अशा इशारा भारतीय लष्कराने मंगळवारी पाकिस्तानचे व दहशतवाद्यांचे नाव न घेता दिला. पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारतीय जनता एकजुटीने सहभागी झाली.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी यांना हादरा, महिला आरक्षण विधेयक नामंजूर २८ मते कमी; इतर 2 विधेयकेही मागे घेतली

काश्मीरमधील सरकार, अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश

– पर्यटकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सरकार, अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांच्या मदतीने गेल्या वर्षभरात मोठे प्रयत्न केले आहेत.

– त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, भारतासह जगभरातून पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येच आहेत. गेल्या महिन्यात देशभरातून ३.८ लाखांहून अधिक पर्यटकांनी श्रीनगरमधील प्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनला भेट दिली.

– पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या २६ जणांची नावे कोरलेले एक स्मारक तेथील नदीकाठी उभारण्यात आले असून, तिथे आता पर्यटक थांबून येथे श्रद्धांजली अर्पण करतात.

अधिक वाचा  महाराष्ट्र राज्य आता ‘रेड’झोनमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप …यामुळे उष्णतेत वाढ; पुणे जिल्ह्यातही तापमान चाळीशी पार