ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई तिव्र… आसाम रायफल्सने 10 अतिरेक्यांचा केला खात्मा

0

मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातील न्यू समतल गावाजवळ भारत-म्यानमार सीमेवर बुधवारी (१४ मे) रात्री झालेल्या तीव्र चकमकीत आसाम रायफल्सने १० अतिरेक्यांना ठार केले. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिलेल्या माहितीनुसार, खेंगजॉय तहसीलमधील या भागात सशस्त्र अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.ऑपरेशन अद्याप सुरू असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

ऑपरेशनची पार्श्वभूमी

भारतीय लष्कराने ‘X’ वर दिलेल्या माहितीनुसार, “चांदेल जिल्ह्यातील न्यू समतल गावाजवळ सशस्त्र अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्याने १४ मे २०२५ रोजी आसाम रायफल्सच्या युनिटने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सुरू केले.” या ऑपरेशनदरम्यान, संशयित अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना आसाम रायफल्सच्या जवानांनी तातडीने पुनर्स्थापना करून संयमित आणि मोजक्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. यानंतर झालेल्या चकमकीत १० अतिरेकी ठार झाले.

अधिक वाचा  सर्वोच्च न्यायालयात ‘फायनल काऊंटडाऊन’ सुरू; शिवसेना कोणाची? ‘या’ तारखेला आरपारची लढाई!

लष्कराने सांगितले की, “या चकमकीत १० अतिरेकी ठार झाले असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.” ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुरक्षा दलांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.